5.
विज्ञान राक्षस : 5 : हळूनगरी
_____________________________________
दुसरा तास संपल्याचे दोन टोले झाले. पानसे गुरुजी नववीचा क्लास घेण्यासाठी बाहेर येऊन हजर झाले. वर्गात इंग्रजीचा दुसरा तास चालू होता. बाई ‘हाय’ ही कविता शिकवीत होत्या.
"आय् नो अ क्युरियस लिटल बॉय
हु इज अल्वेज आसकिंग व्हाय ?
व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ
व्हाय नॉट, व्हाय - बाय अॅण्ड बाय् ?
वर्गाबाहेर उभ्या असलेल्या पानसे गुरुजींना या कवितेच्या ओळी फारच आवडल्या. त्याच ओळी ते गुणगुणू लागले. बाईच्या लक्षात आले की, आपला तास संपला आहे आणि पुढच्या तासाचे शिक्षक बाहेर येऊन उभे आहेत. लगेच त्यांनी शिकविणे थांबविले व त्या वर्गाबाहेर पडल्या.
पानसे गुरुजी ‘हाय’ कवितेच्या ओळी गुणगुणतच वर्गात शिरले. पोरे 'एकसाथ नमस्ते' म्हणाली आणि त्यांनी एकसाथ ' टिंग टॉंग
पिग पॉंग' हा मंत्र म्हटला. तोच धागा पकडून पानसे गुरुजीनी गोष्ट पुढे सुरू केली.
सुदाम व ज्ञानेश्वर यांनी हा मंत्र तीन वेळा म्हटला. नंतर त्यांनी डोळे उघडले, तर काय आश्चर्य ! खरोखरच दोघेही कल्पना ग्रहावरील
एका बंगल्याच्या दिवाणखान्यात पोचलेले..!!सुदाम व ज्ञानेश्वर यांनी सबंध दिवाणखानाभर
एक नजर फिरविली. बसायला उत्तम कोच. मध्यभागी एक टी-पॉय. यावर लाल लाल सफरचंदे असलेली एक थाळी होती. थकले
भागलेले दोन्ही लहान जीव भुकेलेलेही होते. दोघेही कोचावर आरामात विसावले आणि त्यांची नजर टी-पॉयवरील सफरचंदांवर खिळली. दोघांनीही एकमेकांना खूण केली व थाळीतील एक सफरचंद खाण्यासाठी हातात घेतले. दोघेही सफरचंदाला तोड लावणार इतक्यात ...
"टक्, टक्, टक्" असा आवाज दाराच्या दिशेने आला.
दोघेही दचकले.. तोंडाला लावलेले सफरचंद बाजूला करीत त्यांनी दाराकडे नजर टाकली.. पण दारात कोणीच नव्हते.. दार सताड उघडेच.. दोघांनाही वाटले, आपल्याला भास झाला.
झाल्या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघेही सफरचंद तोंडाला लावणार इतक्यात पुन्हा दारावर टक् टक् आवाज .. दोघेही थबकले.. त्यांनी दाराकडे
निरखून पाहिले. दारात तर कोणीच दिसत नव्हते. दोघेही भांबावून गेले. चेष्टामस्करी करायची म्हणून कोणीतरी दारावर टक टक करून पळून जात असले पाहिजे, असा संशय त्यांना आला. या नवख्या जागी नेमके काय
करावे ते त्यांना सुचेना.. पोटातले कावळे काव काव करून कातावले. यामुळे वैतागून पुन्हा या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघांनीही सफरचंद तोंडाला लावले. तोच ... पुन्हा दारावर टक ठक् ..
आता मात्र सुदाम व ज्ञानेश्वर चिडले. "ए देन्या, बघ रे दारात कोण हाय ते ?" सुदाम टक टक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बोलला.
ज्ञानेश्वर वैतागून ताडकन उठला व दाराबाहेर कोण आहे हे पहाण्यासाठी पळत दाराकडे गेला. तोच दारात त्याची कोणाशी तरी जोरात टक्कर झाली.
अग आई ऽ ग ! कोण आहे ? " ज्ञानेश्वर कळवळून बोलला.
"नमस्कार, मी सर्वज्ञे .. या ग्रहावरील जनता संपर्काधिकारी. " कोठूनतरी एक आवाज आला.
"अहो जनता संपर्काधिकारी ! कसली धडक मारलीत माझ्या छातीत रानडुकरासारखी. आणि असं लपून दारावर टक् टक् का केलीत ?"
ज्ञानेश्वर कहत कण्हत रागाने बोलला. ज्ञानेश्वरला आता समोर कोणीतरी एक व्यक्ती दिसू लागली होती.
"असे रागावू नका. मी आपल्याला सगळे काही सांगतो. प्रथम थोडे शांत रहा." जनता संपर्काधिकारी शांतपणे उद्गारला.
"शांत काय व्हा ? तुम्हाला काय म्हणायचे ते लवकर बोला. " सुदाम वैतागून आता समोर दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलला.
"तुम्ही इथं कल्पना ग्रहावरील हळूनगरीत आला आहात हे ध्यानात घ्या. इथं प्रकाशाची गती एका मिनिटास एक मीटर आहे. त्यामुळं …" सर्वज्ञ यांनी सुदाम व ज्ञानेश्वर यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला.
“ इथं प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्याला रानडुकरासारख्या धडका मारण्याचा काय अधिकार?" देनू कळवळून बोलला.
"अहो, माझा खुलासा नीट पुरता ऐकून तरी घ्या. इथं.." सर्वज्ञ विनवणीच्या सुरात बोलू लागले.
"कसला खुलासा करताय् टक्कुऱ्याचा ? तुमच्या धडकेनं माझ्या छातीत चांगलीच चमक भरलीय. अग आई ऽ ग " देनू हाताने छाती चोळीत बोलला.
"प्रथम बेधडक धडक मारायची आणि नंतर त्यावर खुशाल खुलाशाचे मलम लावायचे. ही काय वागण्याची पद्धत झाली?" सुदामने आता
तोंडाचा पट्टा चांगलाच सैल सोडला.
“अहो, जरा तोंड सांभाळून बोला . माझी काहीच चूक नाही. या हळूनगरीत .." इतका वेळ शांत असलेले सर्वज्ञे रागाने बोलले.
"मग काय माझी चूक आहे? वा गुरू." देनूने सर्वज्ञाना पुरते बोलू न देता त्यांच्यावरच आरोपांची सरबत्ती केली.
सुदाम, ज्ञानेश्वर व सर्वज्ञ यांच्यांत चांगलीच बाचाबाची सुरू झाली.. ही गोष्ट ऐकण्यात देहभान हरपलेल्या नाम्या सातपुतेला सुदाम व ज्ञानेश्वर यांच्यावर झालेला अन्याय सहन झाला नाही. गोष्ट सुरू असतानाच नाम्या उठला व म्हणाला,
"सर, खरं म्हणजे चूक त्या जनता संपव अधिकाऱ्याचीच आहे"
"अरे, जनता संपव अधिकारी नव्हे जनता संपर्काधिकारी." पानसे गुरुजी नाम्याला समजावीत होते.
" त्योच, जो कोन असेल त्यो. पण चूक त्याचीच आहे." तुक्या ढेरेने नाम्याला साथ दिली.
" असं कसं म्हणता ? खरं म्हणजे.." पानसे गुरुजी सर्वज्ञांची बाजू घेत आहेत हे पोरांनी ताडलं. त्याना सरांचे म्हणणं मान्य नव्हते.
" वा ऽ सर, दुसऱ्याच्या घरी आलेल्या अनोळखी माणसाची अशी चेष्टा करावी काय ? " पांडबानी सुदाम व ज्ञानेश्वराची बाजू घेतली.
" सर, चूक त्या अधिकाच्याचीच आहे. " वर्गातील सर्व मुलांनी ही सुदाम व ज्ञानेश्वरच्या बाजूने कौल दिला.
"अरे पण ही गोष्ट आहे." पानसे गुरुजींनी गुगली टाकली.
"सर, गोष्ट असली म्हणून काय झालं ? उगाच मारलेली धडक कोणी का म्हणून सहन करायची ? " वर्गातली मुले ठामपणे उत्तरली.
या वाक्याने पानसे गुरुजीच्या विचारांना मात्र धडक बसली. त्यांना आनंद झाला. ते गालातल्या गालात हसले..
‘कोण म्हणतं हा वर्ग वात्रट पोरांचा आहे ? यांना तर गोष्टीत झालेला अन्याय देखील सहन होत नाही. यांना वात्रट कोणी म्हणावं ? यांना कोणी वाह्यात ठरवावे ? मुळात मुलं वात्रट असतात का ? का परिस्थिती त्याना तशी घडवते ? आणि आपण ? आपण त्यावर शिक्कामोर्तब करतो. शिकविलेलं समजत नाही म्हणून शिकण्यात आनंद नाही. मग अभ्यास कोण करणार ?? नव्हे, मुलांनी अभ्यास का करावा ? नापास होणारी मुलं ही शिक्षक पालक, नातेवाईक, समाज या सर्वांच्या मते अगदी वाह्यात कार्टी .., या मुलांच्या अंगी अजिबात गुण नसतात काय ? का या गुणांचे दर्शन घडवून देणारं वातावरण निर्माण होत नाही ? हे वातावरण कुणी निर्मायचं?'
पानसे गुरुजी आढयाकडे टक लावून अशा विचारात मग्न होते.
"सर, सुदाम व ज्ञानेश्वर यांची चूक कशी ते आम्हाला पटवून द्या." दोन-तीन मुलांनी प्रश्न विचारून पानसे गुरुजींची तंद्री भंग केली.
त्याचवेळी चंदूने चोरलेला चेंडू चड्डीतून चुकून खाली पडून चक्क वर्गात घरंगळत टेबलाकडे चालला होता..
पानसे गुरुजी तो घरंगळून आलेला चेंडू हातात घेत म्हणाले, "बघू या कोणाची चूक आहे ती."
चंदू चपापला.. पानसे गुरुजीनी आपले निवेदन सुरू केले.. मुले कान टवकारुन ऐकू लागली..
प्रथम आपण आपल्याला पदार्थ कसे दिसतात ते पाहू. प्रकाशाच्या उगमस्थानापासून म्हणजे दिवसा सूर्यापासून, रात्री दिव्यांपासून असंख्य
प्रकाशकिरण बाहेर पडत असतात. हे किरण पदार्थावर पडून परावर्तित होतात.
"सर, परावर्तित होतात म्हणजे काय ? " शिंप्याच्या जगूने मध्येच प्रश्न विचारला.
पोरांना वाटले आता मध्येच प्रश्न विचारण्याबद्दल जग्या मार खाणार देशपांडे गुरुजीच्या तासाला यामुळेच कोणी प्रश्न विचारीत नसे. काही पोरांनी सरांना नकळत जग्याला खाली बसण्याची खूण केली. शेजारीच बसलेल्या नाम्याने जग्याचा शर्ट पण ओडला. सगळया वर्गाचे लक्ष आता काय घडणार इकडे लागले.
" शाब्बास जगन्नाथा ! चांगला प्रश्न विचारलास तू मुलांनो, जगन्नाथासारखे न घाबरता तुम्हीही वर्गात प्रश्न विचारले पाहिजेत." पानसे गुरुजीनी वर्गाला आवाहन केले वर्ग आनंदला.
'अरे, सरांनी आपल्याला प्रश्न विचारायला परवानगी दिली. देशपांडे सरांच्या तासाला प्रश्न विचारला की बसला मार. इतर सरांनाही त्यांच्या शिकविण्याची तंद्री भंग केलेली आवडत नाही. काही शिक्षक तर 'नंतर सांगतो, बस खाली' असे म्हणून बोळवण करतात आणि इकडं तर पानसे गुरुजी जगन्नाथाची पाठ थोपटताहेत.' मुले चांगलीच चक्रावून गेली.
पानसे गुरुजीनी परावर्तनाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी हातातील चेंडू भिंतीवर मारला व ते म्हणाले,
"हे पहा, मी भिंतीवर मारलेला चेंडू भिंतीवर आपटून परत आला. असे प्रकाशकिरण पदार्थावर पडतात व परत येतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. समजल का जगन्नाथा ?"
जग्याने ऐटीत मान डोलवून आपली समज सरांना कळविली.
"पदार्थावर पडून परावर्तित झालेले किरण आपल्या डोळ्यात गेले की तो पदार्थ आपल्याला दिसतो." पानसे गुरुजींनी पदार्थ कसा दिसतो याचे स्पष्टीकरण पूर्ण केले.
" तुमच्यासमोर दोन मीटर अंतरावर जर एखादा पदार्थ असेल तर तो तुम्हाला किती वेळानं दिसेल ?" पानसे गुरूजींनी प्रश्न केला.
"पदार्थावरील परावर्तित किरण पदार्थापासून डोळ्या पर्यंत पोचण्यास जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळाने पदार्थ दिसेल," दोन-तीन मुले एकदम म्हणाली.
"सर, म्हणजेच प्रकाशकिरणांना दोन मीटर अंतर तोडायला जेवढा वेळ लागेल तेवढया वेळानं पदार्थ दिसेल." जग्याने मुलांच्या उत्तरात दुरुस्ती केली.
"बरोबर, प्रकाशाची गती एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर .. म्हणजेच एका सेकंदाला तीस कोटी मीटर आहे, हे ध्यानात घ्या. एवढया
प्रचंड वेगानं प्रकाशकिरण प्रवास करत असतात," पानसे गुरुजींनी सांगितले.
" अबबब ... ! सेकंदात तीस कोटी मीटर अंतर तोडायचे ? म्हणजे फारच जंगी वेगानं प्रकाश धावतो म्हणायचा!" मुलांनी प्रकाशाच्या प्रचंड
वेगाचे कौतुक केले
"याचा अर्थ तीस कोटी मीटर अंतर तोडावयाला प्रकाशाला केवळ एक सेकंद लागतो. तर दोन मीटर अंतर प्रकाश किती वेळेत कापील ?"
पानसे गुरुजींनी मुलांना साधे त्रैराशिक घातले.
"सर, दोन भागिले तीन कोटी सेकंद" एक दोन पोरांनी झटक्यात उत्तर दिले.
" म्हणजे, सर, सेकंदाचा अगदी अगदी लहान भाग. " दोन-तीन मुलांनी त्यांच्या भाषेत त्यांची समज व्यक्त केली.
"म्हणजे प्रकाशाची एवढी प्रचंड गती आहे म्हणूनच आपल्यासमोर पदार्थ आपल्याला अत्यंत अल्प वेळात म्हणजेच लगेच दिसतो," पानसे गुरुजी एक कल्पना मुलांच्या गळी उतरविल्याच्या आनंदात बोलले.
प्रकाशाच्या प्रचंड गतीबद्दल प्रकाशाला धन्यवाद देत मुलांनी माना डोलावून पानसे गुरुजींना आपल्याला ही कल्पना पटल्याचा होकार दिला.
मुलांच्या उत्साहाचा फायदा घेऊन पानसे गुरुजींनी पुढचा प्रश्न विचारला, "समजा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर झाली तर दोन मीटर अंतरावरचा पदार्थ आपल्याला किती वेळाने दिसेल ?
प्रश्न अगदीच सोपा होता.
" दोन मिनिटांनी सर," सर्व मुलांनी ओरडून उत्तर दिले .
"शाब्बास रे माझ्या गब्रूंनो ! मग हळूनगरीतील दोन मीटर अंतरावर असलेला संपर्काधिकारी ज्ञानेश्वर व सुदाम यांना किती वेळाने दिसेल ?"
पानसे गुरुजींनी विजयी मुद्रेने प्रश्न केला.
"अर्थातच, दोन मिनिटांनी,"मुलांनी खजील होऊन उत्तर दिले.
"पण सर, टक् टक् आवाज आधी कसा ऐकू आला ?" पांड्याने आपली शंका विचारली.
पानसे गुरुजी म्हणाले, " याचंही उत्तर आता तुम्हीच सांगा. ध्वनीचा वेग एका सेकंदाला ३३० मीटर आहे. ..."
"म्हणजे ३३० मीटर अंतर तोडण्यास एक सेकंद तर दोन मीटर अंतर तोडण्यास किती वेळ लागेल ? " दोन-तीन मुलांनी पानसे गुरुजींचे
वाक्य पुरे केले
"सर, दोन भागिले ३३० इतके सेकंद" दुसऱ्या चारपाच मुलांनी लगेच उत्तर दिले.
"म्हणजे दोन मिनिटांपेक्षा कितीतरी कमी वेळ. म्हणूनच टक टक आवाज आधी ऐकू आला, पण समोरची व्यक्ती उशिरा दिसली. त्यामुळे सुदाम व ज्ञानेश्वर यांची चांगलीच फसगत झाली. या हळूनगरीत प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगानं म्हणजे एका मिनिटास एक मीटर यापेक्षा
कमी वेगानं प्रत्येक कृती करणं का आवश्यक आहे हे तुम्हाला समजलं का? पानसे गुरुजींनी आपला खुलासा पूर्ण केला.
" म्हणूनच या नगरीला 'हळूनगरी' हे नाव ठेवलं असावं,.." पांडबा नकळत बोलून गेला.
" पांडवा, नामदेवराव, कळलं का आता चूक कोणाची आहे ती ?" बाळ्याने पांड्याला व नाम्याला डिवचले.
“ कळलं कळलं बरं! तुम्ही नको आम्हाला शहाणपण शिकवायला."
"अरे, असे भांडू नका." पानसे गुरुजींनी पांडू, नामदेव व बाळू यांची समजूत काढली. मग ते म्हणाले,
"पण एक गोष्ट ध्यानात घ्या. या हळूनगरीत स्थिर पदार्थाच्या बाबतीत कोणताच गोंधळ होत नाही."
"सर, ते कसं काय ?" बाळा मध्ये बोलला
"कारण स्थिर पदार्थावर पडले किरण परावर्तित होउन जात असतात. त्यामुळे पदार्थाकडे पाहिले की परावर्तित किरण लगेच डोळ्यात जातात व स्थिर पदार्थ मात्र आपल्याला लगेच दिसतो."
पानसे गुरुजींनी पोरांना आता चांगलेच ताब्यात घेतले होते.
ठण.. ठण.. ठण ....
तिसरा तास संपल्याची घंटा झाली. पानसे गुरुजी म्हणाले, "मुलांनो,.मी.आज तुम्हाला गृहपाठ देणार आहे. याल का करून उद्या ? "
गृहपाठ म्हटल्यावर पोरे बिथरली व गप्पच बसली. कोणीच होकार दिला नाही. तरीही पानसे गुरुजींनी आपला गृहपाठ सांगण्यास सुरुवात केली.
"सुदाम व ज्ञानेश्वर या हळूनगरीत पृथ्वीवरच्या सवयीप्रमाणे कृती करणार, हे साहजिकच आहे. या कृती हळूनगरीतील प्रकाशाच्या गतीपेक्षा
जास्त गतीने होणार, हे उघडच आहे. त्यामुळे त्यांची कशी फजिती होते. यावर प्रत्येकाने लहानसा गंमतीशीर प्रसंग लिहून आणा. पण लक्षात ठेवा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर फक्त... बाकी इतर सर्व नियम
पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे."
हा गंमतशीर गृहपाठ ऐकुन पोरे हरखली. काय गंमतशीर प्रसंग लिहावा यावर प्रत्येकजण विचार करू लागला. गृहपाठ दिल्यावर आनंदी दिसणारे चेहरे पाहून समाधानाने पानसे गुरुजी वर्गाबाहेर पडले.
___________________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648
_____________________________________
दुसरा तास संपल्याचे दोन टोले झाले. पानसे गुरुजी नववीचा क्लास घेण्यासाठी बाहेर येऊन हजर झाले. वर्गात इंग्रजीचा दुसरा तास चालू होता. बाई ‘हाय’ ही कविता शिकवीत होत्या.
"आय् नो अ क्युरियस लिटल बॉय
हु इज अल्वेज आसकिंग व्हाय ?
व्हाय धिस, व्हाय दॅट, व्हाय देन, व्हाय नाऊ
व्हाय नॉट, व्हाय - बाय अॅण्ड बाय् ?
वर्गाबाहेर उभ्या असलेल्या पानसे गुरुजींना या कवितेच्या ओळी फारच आवडल्या. त्याच ओळी ते गुणगुणू लागले. बाईच्या लक्षात आले की, आपला तास संपला आहे आणि पुढच्या तासाचे शिक्षक बाहेर येऊन उभे आहेत. लगेच त्यांनी शिकविणे थांबविले व त्या वर्गाबाहेर पडल्या.
पानसे गुरुजी ‘हाय’ कवितेच्या ओळी गुणगुणतच वर्गात शिरले. पोरे 'एकसाथ नमस्ते' म्हणाली आणि त्यांनी एकसाथ ' टिंग टॉंग
पिग पॉंग' हा मंत्र म्हटला. तोच धागा पकडून पानसे गुरुजीनी गोष्ट पुढे सुरू केली.
सुदाम व ज्ञानेश्वर यांनी हा मंत्र तीन वेळा म्हटला. नंतर त्यांनी डोळे उघडले, तर काय आश्चर्य ! खरोखरच दोघेही कल्पना ग्रहावरील
एका बंगल्याच्या दिवाणखान्यात पोचलेले..!!सुदाम व ज्ञानेश्वर यांनी सबंध दिवाणखानाभर
एक नजर फिरविली. बसायला उत्तम कोच. मध्यभागी एक टी-पॉय. यावर लाल लाल सफरचंदे असलेली एक थाळी होती. थकले
भागलेले दोन्ही लहान जीव भुकेलेलेही होते. दोघेही कोचावर आरामात विसावले आणि त्यांची नजर टी-पॉयवरील सफरचंदांवर खिळली. दोघांनीही एकमेकांना खूण केली व थाळीतील एक सफरचंद खाण्यासाठी हातात घेतले. दोघेही सफरचंदाला तोड लावणार इतक्यात ...
"टक्, टक्, टक्" असा आवाज दाराच्या दिशेने आला.
दोघेही दचकले.. तोंडाला लावलेले सफरचंद बाजूला करीत त्यांनी दाराकडे नजर टाकली.. पण दारात कोणीच नव्हते.. दार सताड उघडेच.. दोघांनाही वाटले, आपल्याला भास झाला.
झाल्या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघेही सफरचंद तोंडाला लावणार इतक्यात पुन्हा दारावर टक् टक् आवाज .. दोघेही थबकले.. त्यांनी दाराकडे
निरखून पाहिले. दारात तर कोणीच दिसत नव्हते. दोघेही भांबावून गेले. चेष्टामस्करी करायची म्हणून कोणीतरी दारावर टक टक करून पळून जात असले पाहिजे, असा संशय त्यांना आला. या नवख्या जागी नेमके काय
करावे ते त्यांना सुचेना.. पोटातले कावळे काव काव करून कातावले. यामुळे वैतागून पुन्हा या घटनेकडे दुर्लक्ष करून दोघांनीही सफरचंद तोंडाला लावले. तोच ... पुन्हा दारावर टक ठक् ..
आता मात्र सुदाम व ज्ञानेश्वर चिडले. "ए देन्या, बघ रे दारात कोण हाय ते ?" सुदाम टक टक प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बोलला.
ज्ञानेश्वर वैतागून ताडकन उठला व दाराबाहेर कोण आहे हे पहाण्यासाठी पळत दाराकडे गेला. तोच दारात त्याची कोणाशी तरी जोरात टक्कर झाली.
अग आई ऽ ग ! कोण आहे ? " ज्ञानेश्वर कळवळून बोलला.
"नमस्कार, मी सर्वज्ञे .. या ग्रहावरील जनता संपर्काधिकारी. " कोठूनतरी एक आवाज आला.
"अहो जनता संपर्काधिकारी ! कसली धडक मारलीत माझ्या छातीत रानडुकरासारखी. आणि असं लपून दारावर टक् टक् का केलीत ?"
ज्ञानेश्वर कहत कण्हत रागाने बोलला. ज्ञानेश्वरला आता समोर कोणीतरी एक व्यक्ती दिसू लागली होती.
"असे रागावू नका. मी आपल्याला सगळे काही सांगतो. प्रथम थोडे शांत रहा." जनता संपर्काधिकारी शांतपणे उद्गारला.
"शांत काय व्हा ? तुम्हाला काय म्हणायचे ते लवकर बोला. " सुदाम वैतागून आता समोर दिसणाऱ्या व्यक्तीशी बोलला.
"तुम्ही इथं कल्पना ग्रहावरील हळूनगरीत आला आहात हे ध्यानात घ्या. इथं प्रकाशाची गती एका मिनिटास एक मीटर आहे. त्यामुळं …" सर्वज्ञ यांनी सुदाम व ज्ञानेश्वर यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला.
“ इथं प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर आहे म्हणून तुम्हाला दुसऱ्याला रानडुकरासारख्या धडका मारण्याचा काय अधिकार?" देनू कळवळून बोलला.
"अहो, माझा खुलासा नीट पुरता ऐकून तरी घ्या. इथं.." सर्वज्ञ विनवणीच्या सुरात बोलू लागले.
"कसला खुलासा करताय् टक्कुऱ्याचा ? तुमच्या धडकेनं माझ्या छातीत चांगलीच चमक भरलीय. अग आई ऽ ग " देनू हाताने छाती चोळीत बोलला.
"प्रथम बेधडक धडक मारायची आणि नंतर त्यावर खुशाल खुलाशाचे मलम लावायचे. ही काय वागण्याची पद्धत झाली?" सुदामने आता
तोंडाचा पट्टा चांगलाच सैल सोडला.
“अहो, जरा तोंड सांभाळून बोला . माझी काहीच चूक नाही. या हळूनगरीत .." इतका वेळ शांत असलेले सर्वज्ञे रागाने बोलले.
"मग काय माझी चूक आहे? वा गुरू." देनूने सर्वज्ञाना पुरते बोलू न देता त्यांच्यावरच आरोपांची सरबत्ती केली.
सुदाम, ज्ञानेश्वर व सर्वज्ञ यांच्यांत चांगलीच बाचाबाची सुरू झाली.. ही गोष्ट ऐकण्यात देहभान हरपलेल्या नाम्या सातपुतेला सुदाम व ज्ञानेश्वर यांच्यावर झालेला अन्याय सहन झाला नाही. गोष्ट सुरू असतानाच नाम्या उठला व म्हणाला,
"सर, खरं म्हणजे चूक त्या जनता संपव अधिकाऱ्याचीच आहे"
"अरे, जनता संपव अधिकारी नव्हे जनता संपर्काधिकारी." पानसे गुरुजी नाम्याला समजावीत होते.
" त्योच, जो कोन असेल त्यो. पण चूक त्याचीच आहे." तुक्या ढेरेने नाम्याला साथ दिली.
" असं कसं म्हणता ? खरं म्हणजे.." पानसे गुरुजी सर्वज्ञांची बाजू घेत आहेत हे पोरांनी ताडलं. त्याना सरांचे म्हणणं मान्य नव्हते.
" वा ऽ सर, दुसऱ्याच्या घरी आलेल्या अनोळखी माणसाची अशी चेष्टा करावी काय ? " पांडबानी सुदाम व ज्ञानेश्वराची बाजू घेतली.
" सर, चूक त्या अधिकाच्याचीच आहे. " वर्गातील सर्व मुलांनी ही सुदाम व ज्ञानेश्वरच्या बाजूने कौल दिला.
"अरे पण ही गोष्ट आहे." पानसे गुरुजींनी गुगली टाकली.
"सर, गोष्ट असली म्हणून काय झालं ? उगाच मारलेली धडक कोणी का म्हणून सहन करायची ? " वर्गातली मुले ठामपणे उत्तरली.
या वाक्याने पानसे गुरुजीच्या विचारांना मात्र धडक बसली. त्यांना आनंद झाला. ते गालातल्या गालात हसले..
‘कोण म्हणतं हा वर्ग वात्रट पोरांचा आहे ? यांना तर गोष्टीत झालेला अन्याय देखील सहन होत नाही. यांना वात्रट कोणी म्हणावं ? यांना कोणी वाह्यात ठरवावे ? मुळात मुलं वात्रट असतात का ? का परिस्थिती त्याना तशी घडवते ? आणि आपण ? आपण त्यावर शिक्कामोर्तब करतो. शिकविलेलं समजत नाही म्हणून शिकण्यात आनंद नाही. मग अभ्यास कोण करणार ?? नव्हे, मुलांनी अभ्यास का करावा ? नापास होणारी मुलं ही शिक्षक पालक, नातेवाईक, समाज या सर्वांच्या मते अगदी वाह्यात कार्टी .., या मुलांच्या अंगी अजिबात गुण नसतात काय ? का या गुणांचे दर्शन घडवून देणारं वातावरण निर्माण होत नाही ? हे वातावरण कुणी निर्मायचं?'
पानसे गुरुजी आढयाकडे टक लावून अशा विचारात मग्न होते.
"सर, सुदाम व ज्ञानेश्वर यांची चूक कशी ते आम्हाला पटवून द्या." दोन-तीन मुलांनी प्रश्न विचारून पानसे गुरुजींची तंद्री भंग केली.
त्याचवेळी चंदूने चोरलेला चेंडू चड्डीतून चुकून खाली पडून चक्क वर्गात घरंगळत टेबलाकडे चालला होता..
पानसे गुरुजी तो घरंगळून आलेला चेंडू हातात घेत म्हणाले, "बघू या कोणाची चूक आहे ती."
चंदू चपापला.. पानसे गुरुजीनी आपले निवेदन सुरू केले.. मुले कान टवकारुन ऐकू लागली..
प्रथम आपण आपल्याला पदार्थ कसे दिसतात ते पाहू. प्रकाशाच्या उगमस्थानापासून म्हणजे दिवसा सूर्यापासून, रात्री दिव्यांपासून असंख्य
प्रकाशकिरण बाहेर पडत असतात. हे किरण पदार्थावर पडून परावर्तित होतात.
"सर, परावर्तित होतात म्हणजे काय ? " शिंप्याच्या जगूने मध्येच प्रश्न विचारला.
पोरांना वाटले आता मध्येच प्रश्न विचारण्याबद्दल जग्या मार खाणार देशपांडे गुरुजीच्या तासाला यामुळेच कोणी प्रश्न विचारीत नसे. काही पोरांनी सरांना नकळत जग्याला खाली बसण्याची खूण केली. शेजारीच बसलेल्या नाम्याने जग्याचा शर्ट पण ओडला. सगळया वर्गाचे लक्ष आता काय घडणार इकडे लागले.
" शाब्बास जगन्नाथा ! चांगला प्रश्न विचारलास तू मुलांनो, जगन्नाथासारखे न घाबरता तुम्हीही वर्गात प्रश्न विचारले पाहिजेत." पानसे गुरुजीनी वर्गाला आवाहन केले वर्ग आनंदला.
'अरे, सरांनी आपल्याला प्रश्न विचारायला परवानगी दिली. देशपांडे सरांच्या तासाला प्रश्न विचारला की बसला मार. इतर सरांनाही त्यांच्या शिकविण्याची तंद्री भंग केलेली आवडत नाही. काही शिक्षक तर 'नंतर सांगतो, बस खाली' असे म्हणून बोळवण करतात आणि इकडं तर पानसे गुरुजी जगन्नाथाची पाठ थोपटताहेत.' मुले चांगलीच चक्रावून गेली.
पानसे गुरुजीनी परावर्तनाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी हातातील चेंडू भिंतीवर मारला व ते म्हणाले,
"हे पहा, मी भिंतीवर मारलेला चेंडू भिंतीवर आपटून परत आला. असे प्रकाशकिरण पदार्थावर पडतात व परत येतात, यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. समजल का जगन्नाथा ?"
जग्याने ऐटीत मान डोलवून आपली समज सरांना कळविली.
"पदार्थावर पडून परावर्तित झालेले किरण आपल्या डोळ्यात गेले की तो पदार्थ आपल्याला दिसतो." पानसे गुरुजींनी पदार्थ कसा दिसतो याचे स्पष्टीकरण पूर्ण केले.
" तुमच्यासमोर दोन मीटर अंतरावर जर एखादा पदार्थ असेल तर तो तुम्हाला किती वेळानं दिसेल ?" पानसे गुरूजींनी प्रश्न केला.
"पदार्थावरील परावर्तित किरण पदार्थापासून डोळ्या पर्यंत पोचण्यास जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळाने पदार्थ दिसेल," दोन-तीन मुले एकदम म्हणाली.
"सर, म्हणजेच प्रकाशकिरणांना दोन मीटर अंतर तोडायला जेवढा वेळ लागेल तेवढया वेळानं पदार्थ दिसेल." जग्याने मुलांच्या उत्तरात दुरुस्ती केली.
"बरोबर, प्रकाशाची गती एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर .. म्हणजेच एका सेकंदाला तीस कोटी मीटर आहे, हे ध्यानात घ्या. एवढया
प्रचंड वेगानं प्रकाशकिरण प्रवास करत असतात," पानसे गुरुजींनी सांगितले.
" अबबब ... ! सेकंदात तीस कोटी मीटर अंतर तोडायचे ? म्हणजे फारच जंगी वेगानं प्रकाश धावतो म्हणायचा!" मुलांनी प्रकाशाच्या प्रचंड
वेगाचे कौतुक केले
"याचा अर्थ तीस कोटी मीटर अंतर तोडावयाला प्रकाशाला केवळ एक सेकंद लागतो. तर दोन मीटर अंतर प्रकाश किती वेळेत कापील ?"
पानसे गुरुजींनी मुलांना साधे त्रैराशिक घातले.
"सर, दोन भागिले तीन कोटी सेकंद" एक दोन पोरांनी झटक्यात उत्तर दिले.
" म्हणजे, सर, सेकंदाचा अगदी अगदी लहान भाग. " दोन-तीन मुलांनी त्यांच्या भाषेत त्यांची समज व्यक्त केली.
"म्हणजे प्रकाशाची एवढी प्रचंड गती आहे म्हणूनच आपल्यासमोर पदार्थ आपल्याला अत्यंत अल्प वेळात म्हणजेच लगेच दिसतो," पानसे गुरुजी एक कल्पना मुलांच्या गळी उतरविल्याच्या आनंदात बोलले.
प्रकाशाच्या प्रचंड गतीबद्दल प्रकाशाला धन्यवाद देत मुलांनी माना डोलावून पानसे गुरुजींना आपल्याला ही कल्पना पटल्याचा होकार दिला.
मुलांच्या उत्साहाचा फायदा घेऊन पानसे गुरुजींनी पुढचा प्रश्न विचारला, "समजा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर झाली तर दोन मीटर अंतरावरचा पदार्थ आपल्याला किती वेळाने दिसेल ?
प्रश्न अगदीच सोपा होता.
" दोन मिनिटांनी सर," सर्व मुलांनी ओरडून उत्तर दिले .
"शाब्बास रे माझ्या गब्रूंनो ! मग हळूनगरीतील दोन मीटर अंतरावर असलेला संपर्काधिकारी ज्ञानेश्वर व सुदाम यांना किती वेळाने दिसेल ?"
पानसे गुरुजींनी विजयी मुद्रेने प्रश्न केला.
"अर्थातच, दोन मिनिटांनी,"मुलांनी खजील होऊन उत्तर दिले.
"पण सर, टक् टक् आवाज आधी कसा ऐकू आला ?" पांड्याने आपली शंका विचारली.
पानसे गुरुजी म्हणाले, " याचंही उत्तर आता तुम्हीच सांगा. ध्वनीचा वेग एका सेकंदाला ३३० मीटर आहे. ..."
"म्हणजे ३३० मीटर अंतर तोडण्यास एक सेकंद तर दोन मीटर अंतर तोडण्यास किती वेळ लागेल ? " दोन-तीन मुलांनी पानसे गुरुजींचे
वाक्य पुरे केले
"सर, दोन भागिले ३३० इतके सेकंद" दुसऱ्या चारपाच मुलांनी लगेच उत्तर दिले.
"म्हणजे दोन मिनिटांपेक्षा कितीतरी कमी वेळ. म्हणूनच टक टक आवाज आधी ऐकू आला, पण समोरची व्यक्ती उशिरा दिसली. त्यामुळे सुदाम व ज्ञानेश्वर यांची चांगलीच फसगत झाली. या हळूनगरीत प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी वेगानं म्हणजे एका मिनिटास एक मीटर यापेक्षा
कमी वेगानं प्रत्येक कृती करणं का आवश्यक आहे हे तुम्हाला समजलं का? पानसे गुरुजींनी आपला खुलासा पूर्ण केला.
" म्हणूनच या नगरीला 'हळूनगरी' हे नाव ठेवलं असावं,.." पांडबा नकळत बोलून गेला.
" पांडवा, नामदेवराव, कळलं का आता चूक कोणाची आहे ती ?" बाळ्याने पांड्याला व नाम्याला डिवचले.
“ कळलं कळलं बरं! तुम्ही नको आम्हाला शहाणपण शिकवायला."
"अरे, असे भांडू नका." पानसे गुरुजींनी पांडू, नामदेव व बाळू यांची समजूत काढली. मग ते म्हणाले,
"पण एक गोष्ट ध्यानात घ्या. या हळूनगरीत स्थिर पदार्थाच्या बाबतीत कोणताच गोंधळ होत नाही."
"सर, ते कसं काय ?" बाळा मध्ये बोलला
"कारण स्थिर पदार्थावर पडले किरण परावर्तित होउन जात असतात. त्यामुळे पदार्थाकडे पाहिले की परावर्तित किरण लगेच डोळ्यात जातात व स्थिर पदार्थ मात्र आपल्याला लगेच दिसतो."
पानसे गुरुजींनी पोरांना आता चांगलेच ताब्यात घेतले होते.
ठण.. ठण.. ठण ....
तिसरा तास संपल्याची घंटा झाली. पानसे गुरुजी म्हणाले, "मुलांनो,.मी.आज तुम्हाला गृहपाठ देणार आहे. याल का करून उद्या ? "
गृहपाठ म्हटल्यावर पोरे बिथरली व गप्पच बसली. कोणीच होकार दिला नाही. तरीही पानसे गुरुजींनी आपला गृहपाठ सांगण्यास सुरुवात केली.
"सुदाम व ज्ञानेश्वर या हळूनगरीत पृथ्वीवरच्या सवयीप्रमाणे कृती करणार, हे साहजिकच आहे. या कृती हळूनगरीतील प्रकाशाच्या गतीपेक्षा
जास्त गतीने होणार, हे उघडच आहे. त्यामुळे त्यांची कशी फजिती होते. यावर प्रत्येकाने लहानसा गंमतीशीर प्रसंग लिहून आणा. पण लक्षात ठेवा, प्रकाशाची गती एका मिनिटाला एक मीटर फक्त... बाकी इतर सर्व नियम
पृथ्वीवरच्या नियमाप्रमाणे."
हा गंमतशीर गृहपाठ ऐकुन पोरे हरखली. काय गंमतशीर प्रसंग लिहावा यावर प्रत्येकजण विचार करू लागला. गृहपाठ दिल्यावर आनंदी दिसणारे चेहरे पाहून समाधानाने पानसे गुरुजी वर्गाबाहेर पडले.
___________________________________
विज्ञान राक्षस
" विज्ञानावर आधारित शास्त्रीय नियमांची आलटा पालट झाली तर काय गम्मत घडेल हे सांगणारी विज्ञान कल्पनिका .."
लेखक :
पु. ग. वैद्य © 1977
संपादन व पुनर्लेखन :
प्रसाद पोफळी
9822569648
